Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बैलाला साखळी घातल्यासारखं दिसत…! सोन्याचे दागिने घालून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा टोला

बैलाला साखळी घातल्यासारखं दिसत…! सोन्याचे दागिने घालून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा टोला

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या नवीन दालनाच्या उद्घाटन प्रसंगी पुरुषांना सोन्याचे दागिने घालण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सोन्याचे दागिने स्त्रियांवर शोभून दिसतात. पुरुषांच्या अंगावर ते आकर्षक दिसत नाहीत. गळ्यात जाडजूड चेन घालणारे पुरुष साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात.

अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या लोकांना देखील कानपिचक्या दिल्या. त्यांनी स्पष्ट केले की, सोन्याचे दागिने हे आई, पत्नी, बहिणी आणि मुलीच्या अंगावरच शोभून दिसतात, पुरुषांनी उगाच त्या भानगडीत पडू नये. सोन्याकडे आपण घरातील स्त्रीधन म्हणून पाहतो. त्यामुळे ते स्त्रियांना दिल्यास जास्त चांगले होईल. तथापी, अजित पवारांनी लोकांच्या सोन्यावरील आवडबाबतही भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, आपल्या भागात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सोन्याची प्रचंड आवड आहे. आधुनिक काळात लोकांची खरेदी क्षमता वाढली आहे. अडचणीच्या वेळेस सोनं बँकेत गहाण ठेवता येतं.

याशिवाय पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारच्या मदतीच्या योजना स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितले की, सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा रोष, नाराजी आणि विरोध पाहिला आहे. घरदार उध्वस्त झाल्याने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ही प्रतिक्रिया साहजिक आहे.

दरम्यान, अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकसानीची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी विविध विभागांची मदत घेण्यात येणार असून, सरकार उद्याच्या बैठकीत याबाबत निर्णय घेईल. सध्या तातडीच्या मदतीत प्रत्येक शेतकऱ्यास 5000 रुपये रोख, अन्नधान्य, कपडे आणि निवारा यासारखी मदत दिली जात आहे. अजित पवार यांनी स्पष्ट केले की, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही यावेळी अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!