Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अहिल्यानगरमध्ये अचानक रस्त्यावर उतरले शेकडो लोक; पोलिसांकडून लाठीचार्ज, काय आहे नेमकं प्रकरण?

अहिल्यानगरमध्ये अचानक रस्त्यावर उतरले शेकडो लोक; पोलिसांकडून लाठीचार्ज, काय आहे नेमकं प्रकरण?

अहिल्यानगर: आज सकाळी अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा तणाव निर्माण झाला. दुर्गा मातेच्या मिरवणूकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे काही नागरिक नगरच्या कोटला परिसरात जमा झाले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यानंतर स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी काही आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. तथापी, पोलिसांनी काही लोकांना ताब्यातही घेतले. या लाठीचार्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नगर पोलीस दलाचे अधिकाऱ्यांनी घटनाक्रम स्पष्ट करत सांगितले की, सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रस्त्यावर रांगोळी काढली होती. त्यावर एका समाजाने आक्षेप घेतला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रांगोळी काढलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. यानंतर संबंधित गटाचे काही सदस्य कोटला परिसरात जमा झाले आणि रस्त्यावर आंदोलन केले. पोलीसांनी त्यांना हटण्याची सूचना केली आणि विनंती केली, परंतु ते तिथून उठले नाहीत.

जमावाकडून पोलिसांवर दगडफेक –

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांपैकी काहींनी दगडफेक केली, ज्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जमावातील काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे. तथापी, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!