Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Varadkhurd Accident: मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच काळाचा घाला! वऱ्हाडाच्या गाडीचा टायर फुटला अन् घात झाला; नववधूसह तिघांचा मृत्यू

Varadkhurd Accident: मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच काळाचा घाला! वऱ्हाडाच्या गाडीचा टायर फुटला अन् घात झाला;  नववधूसह तिघांचा मृत्यू

Varadkhurd Accident: आनंदाने ओसंडून वाहणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडावर जळगावमधील वराडखुर्द जवळ अचानक शोककळा पसरली आहे. गुजरातच्या वापी येथून लग्न उरकून अकोल्याकडे परतणाऱ्या क्रूझर कारला वराडखुर्द महामार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात नुकतंच लग्न लागलेल्या नववधूसह कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टायर फुटल्याने सुसाट कार टँकरवर आदळली
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर धावत असताना अचानक कारचे टायर फुटले. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि सुसाट कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर प्रचंड वेगाने जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच नववधूवर काळाने झडप घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यूशी झुंज आणि जखमींची स्थिती
या अपघातात नववधू पूजा रवी वाघळकर यांच्यासह दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतांची नावे समोर आली असली तरी जखमींची स्थिती चिंताजनक आहे. या भीषण घटनेत ६ जण गंभीर जखमी झाले असून, त्यात एका लहान चिमुरड्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हातावरची लग्नाची मेहंदी सुकण्यापूर्वीच नववधूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने अकोला आणि वापी येथील नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. महामार्गावरील या भीषण अपघाताने प्रवासादरम्यान टायरची स्थिती आणि वेग यावर पुन्हा एकदा चर्चेचे सावट निर्माण झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!