Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik News: नाशिक हादरलं! अंघोळीचा साबण गिळल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Nashik News: नाशिक हादरलं! अंघोळीचा साबण गिळल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Nashik News: मुंबईतील कलिंगड दुर्घटना ताजी असताना नाशिकमधून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अंघोळीचा साबण खाल्ल्यामुळे एका २० वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. अथर्व द्विवेदी असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने नाशिकमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?
अथर्व हा ‘स्पेशल चाइल्ड’ (विशेष बालक) होता. काय खावे आणि काय खाऊ नये, याची पुरेशी समज नसल्यामुळे त्याने राहत्या घरी अंघोळीचा साबण खाल्ला. साबण पोटात गेल्यामुळे काही वेळातच त्याची प्रकृती खालावली आणि त्याला तीव्र त्रास होऊ लागला.

रुग्णालयात धाव

कुटुंबीयांनी अथर्वला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले. अथर्वची तपासणी करताना डॉक्टरांच्याही पायाखालची जमीन सरकली. शरीरातील अंतर्गत रासायनिक प्रक्रियेमुळे त्याची प्रकृती हाताबाहेर गेली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पोलीस तपास सुरू
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच इंदिरा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या विचित्र मृत्यूमागील तांत्रिक कारणांचा शोध घेतला जात आहे. विशेष मुलांच्या पालकांनी अशा घातक वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!