Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बस चालवत असताना मोबाईलवर मॅच पाहणे भोवले, मुंबई-स्वारगेट ई-शिवनेरी बसचा चालक बडतर्फ

बस चालवत असताना मोबाईलवर मॅच पाहणे भोवले, मुंबई-स्वारगेट ई-शिवनेरी बसचा चालक बडतर्फ

मुंबई: बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले आहे. तसेच संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे. एसटी महामंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली.

दादर येथून स्वारगेटकडे निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक 22 मार्च रोजी रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत क्रिकेट मॅच बघत होता. याचे व्हिडिओ शूटिंग संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकरणी बडतर्फ केले आहे. तसेच सदर खाजगी संस्थेला 5000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

यावेळी बोलताना परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी एक प्रतिष्ठित बस सेवा आहे. या ई-शिवनेरी बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती देखील प्रवास करीत असतात. तसेच अपघातविरहित सेवा म्हणून या बस सेवेकडे पाहिले जाते. त्यामुळे बेशिस्त पद्धतीने वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होईल, असंही सरनाईक म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!