Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pandharpur VIP Darshan: पंढरपुरात व्हीआयपी संस्कृतीला चाप; जिल्हाधिकाऱ्यांच्या एका निर्णयामुळे सामान्य वारकऱ्यांना दिलासा

Pandharpur VIP Darshan: पंढरपुरात व्हीआयपी संस्कृतीला चाप; जिल्हाधिकाऱ्यांच्या एका निर्णयामुळे सामान्य वारकऱ्यांना दिलासा

Pandharpur VIP Darshan: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांसाठी एक अत्यंत सुखावणारी बातमी आहे. मंदिर प्रशासनाने व्हीआयपी (VIP) दर्शनावर तात्पुरती बंदी घातल्यामुळे, आता रांगेत ताटकळत उभे राहणाऱ्या थेट वारकऱ्यांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात शांतपणे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. “आज इतक्या वर्षांत पहिल्यांदाच विठ्ठलाची खरी भेट झाली,” अशा भावूक प्रतिक्रिया दर्शनानंतर भाविकांच्या मुखातून उमटत आहेत.

अधिकमासामुळे पंढरीत भाविकांचा पूर
सध्या सुरू असलेल्या पवित्र पुरुषोत्तम (अधिक) मासामुळे पंढरपुरात दररोज लाखो भक्तांची माउलींच्या दर्शनासाठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. आषाढी वारीसारखेच विहंगम दृश्य सध्या पंढरीत असून, दररोज साधारण ७ ते ८ लाख भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. या अथांग गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे थांबवण्याचा कडक निर्णय घेतला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी सुरू होताच मंदिरातील चित्र पूर्णपणे बदलले आहे.

नेमका काय झालाय बदल?
यापूर्वी देवाच्या महापूजा आणि नित्योपचाराच्या वेळी विशिष्ट अतिमहत्त्वाच्या (VIP) व्यक्तींनाच देवासमोर बसून पूजेचा आनंद घेता यायचा. आता त्याच जागेवर सामान्य वारकऱ्यांना बसवून देवाचे रूप डोळ्यात साठवण्याची संधी दिली जात आहे. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांनी सांगितले की, “तासन्तास रांगेत उभे राहूनही यापूर्वी कधी गाभाऱ्यात एवढा वेळ शांतता मिळाली नव्हती. हा निर्णय आमच्यासारख्या गरिबांसाठी देवाघरचा प्रसादासारखा आहे.”

दर्शनाचा वेळ घटला, रांगांचा वेग वाढला

व्हीआयपी संस्कृतीला चाप लावल्यामुळे केवळ व्हीआयपी जागाच मोकळी झाली नाही, तर संपूर्ण मंदिर परिसरातील गोंधळ कमी झाला आहे. प्रशासनाच्या या कौतुकास्पद निर्णयामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायातून आणि महाराष्ट्रातील भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!