Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Eknath Shinde: कांदा आंदोलनावरून राजकीय रणकंदन, हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘कुठे राजा भोज, कुठे गंगू तेली’

Eknath Shinde: कांदा आंदोलनावरून राजकीय रणकंदन, हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘कुठे राजा भोज, कुठे गंगू तेली’

Eknath Shinde: नाशिकमधील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या विराट महामोर्च्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आयोजित या आंदोलनात काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आता थेट शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यासपीठावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत टीकास्त्र सोडले. या टीकेचा तीव्र समाचार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळांना सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, हा प्रकार म्हणजे निव्वळ ‘सूर्यावर थुंकण्यासारखा’ असल्याचा घणाघात केला आहे.

कांदा खरेदीवरून केंद्राच्या धोरणांवर सपकाळांचा निशाणा
चांदवडच्या शेतकरी विचारपीठावरून बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणाचे जाहीर वाभाडे काढले. देशांतर्गत कांदा उत्पादक पूर्णपणे अडचणीत येण्यास दिल्लीतील सरकारचे चुकीचे निर्णयच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राच्या धरसोडीच्या धोरणांमुळे बांगलादेश व श्रीलंकेसारखे पारंपरिक शेजारी देश आता भारताचा कांदा स्वीकारायला तयार नाहीत, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना दलालांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी कांद्याची संपूर्ण खरेदी ही केवळ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (APMC) माध्यमातूनच झाली पाहिजे, अशी मागणी करत जोपर्यंत हे विद्यमान सरकार सत्तेवर आहे, तोपर्यंत देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भले होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

“आश्वासनांची केवळ खैरात!” – मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती प्रहार
पंतप्रधानांनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी आपला मोर्चा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला. राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून राज्य सरकार मात्र यावर ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात आज ‘सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी’ अशी अत्यंत विदारक स्थिती निर्माण झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रति किलो 24 रुपयांनी कांदा खरेदी करण्याचे जे आश्वासन दिले होते, ते पूर्णपणे हवेत विरले आहे. हे सरकार केवळ खोट्या आश्वासनांची खैरात करणारे सरकार आहे, अशी तिखट टीका त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला कडक इशारा
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्ताधारी गोटातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळांच्या विधानाचा तीव्र निषेध करत ही त्यांची राजकीय अपरिपक्वता असल्याचे म्हटले आहे. पलटवार करताना शिंदे म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ हे जेमतेम 1 ते 1.5 वर्षापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. ज्यांच्यावर ते चिखलफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे धुरंधर आणि जागतिक स्तरावरील विकासाचे महामेरू आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला लगावताना पुढे म्हटले की, पंतप्रधानांवर अशा खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे स्वतःच्याच तोंडावर पडण्यासारखे आहे. हा प्रकार म्हणजे ‘कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली’ असा असून तो सूर्यावर थुंकण्यासारखाच आहे. काँग्रेस नेत्यांच्या या बेजबाबदार आणि पातळी सोडलेल्या वक्तव्यांबद्दल देशातील तब्बल 140 कोटी जनता त्यांना आगामी निवडणुकीत योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!