Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नोकरीत असताना घेतलेला ऑटोरिक्षा परवाना जमा करा; पुणे आरटीओचे आवाहन

नोकरीत असताना घेतलेला ऑटोरिक्षा परवाना जमा करा; पुणे आरटीओचे आवाहन

पुणे: सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा संघटीत क्षेत्रासह इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत असलेल्या व्यक्तीने ऑटोरिक्षा परवाना घेतला असेल, तर त्यांनी तत्काळ स्वेच्छेने जमा करावा. हे परवाने येत्या ३० एप्रिलपर्यंत जमा करण्यास मुदतवाढ दिली आहे, असे पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) स्वप्निल भोसले यांनी सांगितले. मुदतीनंतर अशा पद्धतीने धारण केलेले ऑटोरिक्षा परवाने निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे कार्यक्षेत्रात खुले ऑटोरिक्षा परवाना धोरण राबविण्यात येत आहे. मात्र, हा परवाना धारण करताना कोणत्याही ठिकाणी तो नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, तरीही काही नोकरदारांनी (सरकारी/निमसरकारी) ऑटोरिक्षा परवाने घेऊन रिक्षा चालवत असल्याचे किंवा भाडेतत्वावर दिल्याचे समोर आले. त्यामुळे असा परवानाधारक व्यक्तींनी ३१ मार्चपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वेच्छेने जमा करावे, असे आवाहन करण्यात आले. त्यामध्ये बोटावर मोजता येईल एवढेच परवाने जमा झाले. त्यामुळे परवाने जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ३० एप्रिलपर्यंत हे परवाने जमा करावे, असे आवाहन पुणे आरटीओकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!