Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोलापुरात हृदयद्रावक अपघात! कालव्यात कार कोसळली; मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू, जावई बचावला

सोलापुरात हृदयद्रावक अपघात! कालव्यात कार कोसळली; मुलीसह आई-वडिलांचा मृत्यू, जावई बचावला

Solapur Car Accident : सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून फोंडशिरसकडे निघालेली कार नीरा उजवा कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर चालक सुनील टिळेकर थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावर हा अपघात घडला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडली. पाण्यात बुडाल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

या अपघातात प्रीती टिळेकर (३०), मंजुळा जठार (५०) आणि हनुमंत जठार (५५) यांचा मृत्यू झाला. तिघेही मुंबईत वास्तव्यास असून मूळचे माण तालुक्यातील मोगराळे गावचे रहिवासी होते. सुनील टिळेकर हे गंभीर जखमी अवस्थेत बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रामनवमीच्या निमित्ताने कुटुंब फोंडशिरसला आले होते. परतीच्या प्रवासात हा दुर्दैवी अपघात घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. प्राथमिक तपासात भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!