Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune land scam case : पार्थ पवारांच्या कंपनीशी जोडलेल्या दुय्यम निबंधक रवींद्र तारू अटकेत

Pune land scam case : पार्थ पवारांच्या कंपनीशी जोडलेल्या दुय्यम निबंधक रवींद्र तारू अटकेत

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळ्यात पोलिस कारवाई तीव्र झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचे भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीशी जोडलेल्या व्यवहारातील दुय्यम निबंधक रवींद्र बलकृष्ण तारू (५८) यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (७ डिसेंबर) भोर येथील त्याच्या निवासस्थानीून अटक केली.

यापूर्वीच मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवानी (४४) याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) ४ डिसेंबरला अटक केली असून, तिची सखोल चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यात १८०० कोटी रुपयांच्या सरकारी जमिनीला केवळ ३०० कोटींना विक्री, स्टॅम्प ड्यूटी फसवणूक आणि नियमबाह्य दस्तऐवज तयार करण्याचे गंभीर आरोप आहेत.

हा घोटाळा मुंढवा येथील सन सर्भे नं. ८८ वरील ४० एकर (१७ हेक्टर ५१ आर) महार वतन जमिनीचा आहे, जी बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (बीएसआय) कडे भाडेतत्वावर आहे. ही जमीन राज्य सरकारच्या मालकीची असूनही, तिची अवैध विक्री करण्यात आली. तेजवानीने २७२ मूळ वतनदारांच्या वतीने पॉवर ऑफ अॅटॉर्नी (पीओए) धारण केलेली असून, तिने ही जमीन अमेडियाला विकली. व्यवहार मे २०, २०२५ रोजी बावधान येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवला गेला, ज्यात तारू यांची भूमिका संशयास्पद आहे.

तारू यांच्यावर काय आहेत आरोप

बावधान पोलिस स्टेशनात संयुक्त जिल्हा निबंधक संतोष हिंगणे यांच्या तक्रारीवर ६ नोव्हेंबरला दाखल झालेल्या एफआयआरमध्ये तारू, तेजवानी आणि अमेडियाचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर संगनमताने ६ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी फसवल्याचा आरोप आहे. तारू यांनी ई-म्युटेशन प्रक्रियेत ‘स्किप’ ऑप्शन वापरून सरकारी जमिनीची पडताळणी टाळली आणि तिला ‘चल संपत्ती’ म्हणून नोंदवली, असा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे राज्य सरकारला मोठा महसूल नुकसान झाले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, तारू यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशीतून घोटाळ्याची साखळी उघड होईल.

ईओडब्ल्यूने तेजवानीला दोन वेळा (१४ आणि २० नोव्हेंबर) चौकशीसाठी बोलावले होते. तिने २००६ पासून पीओए धारण केलेली असली तरी राज्य महसूल विभागाने तिच्या मालकीच्या दाव्यांना तीन वेळा नाकारले होते. तरीही तिने मे महिन्यात ११,००० रुपयांचा चालान भरून दस्तऐवज प्रक्रिया सुरू केली आणि अमेडियाशी ३०० कोटींचा करार केला. स्टॅम्प ड्यूटीसाठी केवळ ५०० रुपये भरले गेले, तर उद्योग विभागाने ४८ तासांत २१ कोटींची सूट दिली. हा संपूर्ण व्यवहार फक्त २७ दिवसांत पूर्ण झाला, ज्यामुळे संशय वाढला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!