Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

“आग लागली, आग लागली असं कोणी तरी म्हटलं आणि…”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला जळगाव रेल्वे अपघाताचा थरारक प्रसंग

“आग लागली, आग लागली असं कोणी तरी म्हटलं आणि…”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला जळगाव रेल्वे अपघाताचा थरारक प्रसंग

जळगाव: जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागली असल्याच्या भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. परंतु, याच वेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवले आहे. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी प्रवाशी संदीप जाधव माहिती दिली आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेस जळगाववरुन आली होती. तेवढ्यात कुणीतरी म्हटले की, गाडीला आग लागली. आग लागली म्हटल्यावर लोकांनी खाली उड्या मारल्या. त्याचवेळी समोर बंगळुरुहून येणारी दुसरी गाडी होती, त्या गाडीखाली लोक चिरडले गेले आहेत. नेमके किती लोक चिरडले गेले हे माहीत नाही. परंतु, ब्रेक दाबल्यावर ज्या ठिणग्या उडाल्या, त्यामुळे स्लीपर डब्यातल्या लोकांना आग लागली असे वाटले, त्यानंतर त्यांनी उड्या मारल्या. किती लोक जखमी झाले आहेत? किंवा किती लोक दगावले आहेत ते समजू अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती प्रवासी संदीप जाधव यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
पाच ते सहा प्रवासी आहेत, ज्यांना दुसऱ्या रेल्वेने उडवले आहे. या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजतं आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जखमींना आम्ही तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयांमध्ये दाखल करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.

नेमकी काय घटना कशी घडली?
जळगावहून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती, परधाडे या स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या. या पाहून एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असे सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे एक्सप्रेसमधील ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, नेमकं त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडले. या अपघातात ७ ते ८ प्रवासी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे प्रशासन आता घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तर, जळगावच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळाकडे रवाना झाल्या असून त्यांनीही प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत महत्वाच्या सूचना केल्या आहेत

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!