पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. त्यात आता महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग येथे जिल्हा संसाधन व्यक्ती यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : जिल्हा संसाधन व्यक्ती.
– नोकरीचे ठिकाण : सांगली.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मे २०२६.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषि विभाग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली- ४१६४१५.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sangli.nic.in/en/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


