Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री मृत्युमुखी

अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री मृत्युमुखी

अहमदाबाद: एअर इंडियाच्या AI171 या प्रवासी विमानाचा आज दुपारी एक वाजून ३८ मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबाद शहरात भीषण अपघात झाला. अहमदाबादहून लंडनकडे निघालेलं हे विमान टेक ऑफनंतर काही मिनिटांतच रहिवासी भागात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या विमानात २३० प्रवासी आणि १२ केबिन क्रू सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, सर्व २४२ जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांचा समावेश
या दुर्घटनेत महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश होता. यामध्ये अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी सोनघरे या तीन महिला केबिन क्रूच्या रूपात कार्यरत होत्या, तर महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे प्रवासी होते. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असून, त्या तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी आहेत. विशेष म्हणजे, अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचाही समावेश होता. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांची पत्नी लंडनमध्ये मुलीसोबत आधीच होती, तर मुलगा अमेरिकेहून कौटुंबिक कार्यक्रमासाठी लंडनमध्ये दाखल झाला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.

AI171 या एअर इंडिया विमानात एकूण २३० प्रवासी होते. यामध्ये सर्वाधिक १६९ प्रवासी हे भारतीय नागरिक होते. त्याखालोखाल ५३ प्रवासी ब्रिटीश नागरिक होते. तसेच, या विमानात पोर्तुगालचे ७ नागरिक आणि कॅनडाचा १ नागरिकही प्रवास करत होता. विशेष म्हणजे, या विमानात दोन लहान मुलांचाही समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तांत्रिक बिघाडाचं कारण?
सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानात मागील दोन दिवसांपासून तांत्रिक बिघाड आढळला होता, त्यामुळे ते अहमदाबादमध्येच थांबवण्यात आले होते. आज अखेर टेक ऑफची परवानगी मिळाल्यानंतर हे विमान हवेत झेपावले, पण काही क्षणांतच ते तांत्रिक कारणामुळे कोसळले अशी शक्यता व्यक्त होत आहे. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु कोणत्याही जीवितहानीपासून बचाव होऊ शकला नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!