Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अकरावीसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

अकरावीसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे: अकरावीसाठी सुरू झालेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी गेल्या दोन दिवसांत राज्यातील ९ हजार ३४६ महाविद्यालयांत एकूण ४ लाख ५७ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. यापूर्वी २१ तारखेला तांत्रिक अडचणीमुळे या प्रवेश प्रक्रियेत खंड पडला होता.

अकरावीच्या २० लाख ९२ हजार जागांसाठी ही नोंदणी होत आहे. राज्यातील ९ हजार ३७३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील नोंदणी करता येणार आहे. कॅप फेरीसाठी १८ लाख ७७ हजार ८३९ जागा आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणी आल्या होत्या. मात्र मंगळवारी दुसऱ्या दिवशी ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू होती. विद्यार्थ्यांचे लॉगीन आयडी बनवणे, तसेच नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती, तसेच अकरावी प्रवेशासाठी आवश्यक प्रमुख कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होती.

विद्यार्थ्यांनी ज्या शाळेतून दहावीची परीक्षा दिली, त्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देण्याची कार्यवाही गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे देण्यात आली आहेत. तर काही शाळांमध्ये बुधवारी दिली जाणार आहेत. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक नोंदणी पूर्ण होणार आहे. तसेच काही विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (इंडब्ल्यूएस) प्रमाणपत्र उपलब्ध नाही. त्यांनी ही प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महा ई-सेवा केंद्रामध्ये अर्ज दिलेले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!