Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मद्यधुंद व्यक्तीचा तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; बाजूला हो म्हटल्याच्या कारणावरून वाद

मद्यधुंद व्यक्तीचा तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; बाजूला हो म्हटल्याच्या कारणावरून वाद

यवतमाळ : रस्त्यात झोपून असलेल्या मद्यधुंद व्यक्तीला बाजूला हो असे म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या वादात त्याने एका तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्राणघातक हल्ल्याची ही घटना दारव्हा तालुक्यातील फुबगाव येथे २१ डिसेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

अंकुश उद्धवराव देशमुख (२९, रा. फुबगाव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे तर प्रकाश मंगू पवार (५०, रा. फुबगाव) असे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २१ डिसेंबरला सायंकाळी आरोपी प्रकाश मद्यधुंद अवस्थेत फुबगाव येथील एका रस्त्याच्या मधोमध झोपून होता. यावेळी अंकुश त्या मार्गावरून जात होता. तेथून जाताना त्याला अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्याने आरोपी प्रकाशला रस्त्याच्या बाजूला हो, असे म्हटले.

त्यावर त्याने अंकुशशी वाद घातला. एवढेच नव्हे, तर संतापाच्या भरात त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच ते धावून आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा वाद सोडवून अंकुशला रुग्णालयात नेले. उपचारानंतर त्याने दारव्हा पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून आरोपी प्रकाशविरुद्ध भा.न्या.सं. ११८ (१), ३५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!