Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

मुंबई: केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. या क्युआर कोड सह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा.

येत्या खरीप हंगामात महाबीज चे सर्व प्रमाणित बियाणे हे साथी पोर्टल मधून नोंदणी केलेले असणार आहे व बियाण्याच्या प्रत्येक बॅग वर साथी पोर्टलचा क्यू आर कोड असणार आहे. हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरलेल स्त्रोत बियाणे कोठून मिळाले, या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली आहे, बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणजेच हे बियाणे १००% शुद्ध असल्याची एक प्रकारे खात्रीच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यस्तरीय खरीप २०२५ हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाणे शोध क्षमते (treaceability) करिता केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या साथी पोर्टलचे महत्व अधोरेखित केले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असे सांगितले आहे.

खरीप २०२५ हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळेत बियाणे पुरवठा करण्याकरिता महाबीजने चोख नियोजन केले आहे. यंदा मान्सुन लवकर येण्याची चिन्हे असल्याची पार्श्वभुमी लक्षात घेऊन. बियाणे पुरवठयाचे कार्य सुरू झाले आहे. काही वाणांच्या बियाणेची अतिरिक्त मागणी झाल्यास ते सुद्धा बियाणे उपलब्ध करून देण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाबीजमार्फत एकूण अडीच लाख क्विंटल बियाणे बाजारात पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी ७१००० क्विंटल बियाण्याची मात्र ही विद्यापीठांद्वारे नव्याने संशोधन केलेल्या वाणांची असणार आहे.

याशिवाय राज्य बियाणे महामंडळ म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांमध्ये देखील महाबीज बियाणे पुरवठा करते. या वर्षी सुद्धा राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत विविध पिकातील नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दरांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात तूर रु. १३० प्रति किलो, मूग दर रु. १४० प्रति किलो, उडीद दर रु. १३५, धान (भात) वाणांनुसार रु. ३० ते ४० प्रति किलो, संकरीत बाजरा दर रु १५० प्रति किलो, सुधारित बाजरा दर रु ७० प्रति किलो, नाचणी दर रु. १०० प्रति किलो या अनुदानित दरात उपलब्ध होणार आहे.

याशिवाय पूर्वीची ग्राम बीजोत्पादन योजना आता राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा बियाणे घटक या नावाने येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध होणार आहे. मागील वर्षी पर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १ एकर क्षेत्राच्या मर्यादेतच बियाणे मिळत होते. परंतु यावर्षी ही मर्यादा २.५ एकर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

याशिवाय राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत सोयाबीन पिकासाठी सुवर्णा सोया, फुले दुर्वा, पी.डी.के.व्ही अंबा, एन.आर.सी-१३०, फुले किमया, MACS-१४६०, MACS-७२५ या वाणाचे बियाणे १००% अनुदानावर उपलब्ध होत आहेत. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा लागेल.

वरील सर्व बियाण्याची माहिती देणे तसेच विक्री करण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्याच्या हेतूने महाबीजने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अधिकृत विक्रेत्यांच्या सभा घेतल्या व विक्रेत्यांना बियाणे विक्री साठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

याशिवाय शेतकऱ्यांना बियाणे बाबत माहिती देण्यासाठी गावस्तरावर शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. यात नवनवीन वाणांची व जैविक खते व बुरशीनाशकची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. याव्यतिरीक्त सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता महाबीजने स्वतः चे यूट्यूब चॅनल, महाबीज वार्ता सुरू केले असून यात राज्यभरातील शेतकऱ्यांचे नवनविन वाणांबद्दलचे अनुभव, शेती विषयक महत्वपूर्ण माहिती व तांत्रिक बाबींबद्दल मोठ्या प्रमाणात व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत. youtube.com/@mahabeejvarta या लिंकवर जाऊन दर्जेदार वाणांची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींना आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!