Today सोमवार, 10th नोव्हेंबर 2025
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

यंदा रेडी रेकनरमध्ये सरासरी दहा टक्के वाढ होण्याची शक्यता; एक एप्रिलपासून नवीन दर लागू होणार

यंदा रेडी रेकनरमध्ये सरासरी दहा टक्के वाढ होण्याची शक्यता; एक एप्रिलपासून नवीन दर लागू होणार

पुणे: राज्यात दोन वर्षानंतर यंदाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेडी रेकनरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोंदणी व मुद्रांक विभागात सरासरी ७ ते १० टक्के इतकी वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाने रेडी रेकनरचे दरवाढीचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला आहे. जर रेडी रेकनरचे दर वाढले, तर घरांसह जमिनींच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाकडून एक एप्रिलला राज्यात प्रत्येकवर्षी रेडी रेकनरचे म्हणजेच जमीन, सदनिका, दुकाने इत्यादींचे वार्षिक बाजारमूल्य दर लागू होतात. या विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. या दरानुसार जी रक्कम होईल, त्या रकमेवर नागरिकांना मुद्रांक शुल्क भरावे लागते. नोंदणी व मुद्रांक विभागाने तयार केलेले जमीन, सदनिकांचे दर इतर विभागांकडून ग्राह्य धरले जातात. त्यामुळेच एक एप्रिलला रेडी रेकनरच्या दराकडे सर्वांचे लक्ष असते.

यंदा १५ टक्के वाढीचा प्रस्ताव

यावर्षी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराच्या रेडी रेकनरच्या दरात सरासरी १५ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे, तर नगरपालिका हद्दीत १२ टक्के आणि ग्रामीण भागात सरासरी १० टक्के वाढीची शिफारस नोंदणी व मुद्रांक विभागाने शासनाकडे केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच नगरपालिका हद्दीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढत आहे, अशा शहरालगतच्या गावांचा समावेश प्रभाव क्षेत्रात करण्यात आला आहे. तिथे १०.५० टक्के एवढी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

राज्यात वर्षनिहाय रेडी रेकनरमधील वाढ

वर्ष                वाढ
२०११-१२ – १८ टक्के

२०१२-१३ ३७ टक्के

२०१३-१४ २७ टक्के

२०१४-१५ २२ टक्के

२०१५-१६- १४ टक्के

२०१६-१७- ७ टक्के

२०१७-१८- ५.३० टक्के

२०१८-१९ – वाढ नाही

२०१९-२०- वाढ नाही

२०२०-२१- १.७४ टक्के

२०२१-२२- वाढ नाही

२०२२-२३- ५ टक्के

२०२३-२४- वाढ नाही

२०२४-२५- वाढ नाही

२०२५-२६- (७ ते १० टक्के वाढ प्रस्तावित)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!