Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

माळशिरसमध्ये नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिलेल्या प्रकरणास प्रेमाची किनार; रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा

माळशिरसमध्ये नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिलेल्या प्रकरणास प्रेमाची किनार; रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा

पिलीव(सोलापूर): माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द या युवकाचा सोमवारी रात्री अतिशय निघृणपणे खून करून पिलीव-चांदापुरी रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला होता. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने अक्षरशः महाराष्ट्र हादरला. आकाशच्या शरीरावर चटके देण्यात आले होते. तसेच गुप्तांग कापले होते. तोंडातसुद्धा सळईचे चटके दिले होते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेयसीच्या मदतीनेच आकाशला बोलावून नवरा व इतर नातेवाईकांच्या मदतीने अमानुषपणे हत्या करण्यात आली व वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिला.

शेजारीच त्याची मोटारसायकल होती. मंगळवारी सकाळी मेटकरी मळा येथील लोकांनी हा मृतदेह पाहून पोलीस स्टेशनला खबर दिली. तसेच याचवेळी यश चोरमले याने आकाशच्या आईला खबर दिली. पोलिसांनी रीतसर पंचनामा करून व माळशिरस येथे शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली. यामध्ये प्रेयसीने केलेल्या फोनवरून बराच उलगडा झाला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा व प्रेयसी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेयसीचा नवरा फरारी होता. मात्र, बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याला ताब्यात घेतले. प्रेयसीनेच आपला प्रियकर आकाश याला बोलावून घेऊन नातेवाईकांच्या मदतीने आकाशचा अमानुषपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामधील प्रेयसीचे लग्न झालेले आहे. तिचा पती परदेशात नोकरीला आहे. तसेच आकाशचेही लग्न झाले असून, त्याला दोन महिन्यांचा मुलगा आहे.

रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा

सोमवारी रात्री उशिरा आकाशला आलेल्या फोनमुळे या हत्येला वाचा फुटली. चांदापुरी येथील एका महिलेचे व आकाशचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याचे येणे-जाणे, फोनवरून बोलणे, सोशल मीडियावरून बोलणे सुरू होते. त्यामुळे एवढ्या रात्री आपल्या प्रेयसीचा फोन आला म्हटल्यावर आकाश हा आपल्या आई व पत्नीला मी दहा मिनिटांत परत येतो, असे म्हणून गेला. तो लवकर परत येईना म्हटल्यावर आईने रात्री खूप उशिरा फोन केला, पण तो फोन उचलतच नव्हता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!