Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकाच विमानाने नागपूरला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकाच विमानाने नागपूरला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच विमानाने मुंबईहून नागपूरला रवाना झाले. या प्रवासादरम्यान आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि माजी खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते.

राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना या नेत्यांचा एकत्र प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली होती.

पडद्यामागे काही राजकीय घडामोडी?

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातील प्रवास पाहून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाली का, किंवा पडद्यामागे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

मात्र, उपलब्ध माहितीनुसार हा प्रवास योगायोगाने एकत्र झाल्याचे मानले जात आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना, “आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे,” असे मिश्कीलपणे म्हटल्याची चर्चा आहे.

राजकीय वातावरण तापलेलेच

‘ऑपरेशन टायगर’नंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. अशा परिस्थितीत फडणवीस आणि ठाकरे यांचा एकत्र प्रवास राजकीय चर्चांना नवे वळण देणारा ठरला आहे.

तथापि, या भेटीत कोणतीही औपचारिक राजकीय चर्चा झाली असल्याची किंवा कोणताही राजकीय निर्णय घेण्यात आल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ राजकीय तर्कवितर्कांच्या पातळीवरच आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!