Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

३.४ कोटी मोबाईल क्रमांक, १७ लाख व्हॉट्सअ‍ॅपने खाती ब्लॉक; टेलीकॉम फसवणुकीला आळा घालण्यासाठी कारवाई

३.४ कोटी मोबाईल क्रमांक, १७ लाख व्हॉट्सअ‍ॅपने खाती ब्लॉक; टेलीकॉम फसवणुकीला आळा घालण्यासाठी कारवाई

नवी दिल्ली: देशभरात वाढत्या टेलीकॉम फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संचार साथी पोर्टलद्वारे आतापर्यंत ३.४ कोटींहून अधिक मोबाईल क्रमांक आणि ३.१९ लाख आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत. शिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि बिग डेटाच्या मदतीने १६.९७ लाख व्हॉट्सअ‍ॅप खातीदेखील बंद करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

दूरसंचार विभागाकडून संचार साथी उपक्रमांतर्गत २० हजारहून जास्त एकगठ्ठा एसएमएस पाठविणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. राज्यसभेत एका प्रश्नाचे लिखित उत्तर देताना संचार आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी यांसबंधीची माहिती दिली. सरकारच्या संचार साथी पोर्टलवरून नागरिकांना ‘चक्षु’ पर्यायाच्या मदतीने संशयित फसवणुकीशी संबंधित कम्युनिकेशनबाबत तक्रार करण्याची सुविधा मिळते. अशा तक्रारींचा तपास दूरसंचार विभागाकडून केला जातो. तपासात काही चुकीचे आढळल्यास असे क्रमांक बंद केले जातात. दूरसंचार विभागाकडून एआय आणि बिग डेटा विश्लेषणाच्या मदतीने बनावट दस्तावेजांवर घेण्यात आलेल्या संशयित मोबाईल क्रमांकाची ओळख पटविण्याचे काम केले जाते.

याशिवाय, दूरसंचार विभाग आणि दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी) कडून नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बनावट फोनकॉलची ओळख पटवून त्यावर बंदी घालण्याचे काम या प्रणालीकडून केले जाते. दरम्यान, दूरसंचार सेवा कंपन्यांनी ११५० संस्था आणि व्यक्तीवर निर्बंध घातले आहेत. १८.८ लाखाहून अधिक रिसोर्सेसदेखील तोडण्यात आले आहेत. या कारवायांमुळे अनोंदणीकृत टेलीमार्केटर्स (यूटीएम) विरोधातील तक्रारी घटल्या आहेत. ऑगस्ट २०१४ मध्ये अशा १,८९,४१९ तक्रारी मिळल्या होत्या. पण जानेवारी २०२५ मध्ये ही संख्या कमी होऊन १,३४,८२१ वर आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने १२ फेब्रुवारी रोजी दूरसंचार वाणिज्यिक संचार ग्राहक प्राधान्य नियम्स (टीसीसीपीआर) – २०१८ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!