Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ahilyanagar Election: अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेला सुरुंग! ‘या’ चुकांमुळे 5 उमेदवारांचे अर्ज बाद

Ahilyanagar Election: अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेला सुरुंग! ‘या’ चुकांमुळे 5 उमेदवारांचे अर्ज बाद

Ahilyanagar Election: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा प्रशासकीय फटका बसला आहे. सर्वाधिक ५४ जागांवर शड्डू ठोकणाऱ्या शिंदेसेनेच्या ५ उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आले आहेत. या अनपेक्षित धक्क्यामुळे आता शिवसेनेचे (शिंदे गट) केवळ ४९ उमेदवार मैदानात उरले आहेत.

का बाद झाले अर्ज?

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जांची बारकाईने तपासणी केली असता, शिंदेसेनेच्या उमेदवारांनी केलेल्या गंभीर चुका समोर आल्या:

  • एबी फॉर्मचा घोळ: एका उमेदवाराने मूळ प्रतीऐवजी झेरॉक्स जोडली, तर दोघांच्या फॉर्मवर खाडाखोड आणि ‘व्हाईटनर’चा वापर आढळला.
  • स्वाक्षरीतील चूक: एका अर्जावर अनुमोदकाची स्वाक्षरी चुकीची होती.
  • दस्तावेजांचा अभाव: एका उमेदवाराने वेळेत एबी फॉर्म सादर केला नाही.

ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तयारी करताना झालेल्या घाईमुळे या तांत्रिक त्रुटी राहिल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – BMC Election 2026: आता मुंबईच्या आखाड्यात आठवलेंची एन्ट्री; महायुतीचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरणार गेमचेंजर!

छाननीचा लेखाजोखा

महापालिकेच्या ६८ जागांसाठी एकूण ७८८ अर्ज आले होते. त्यापैकी १७ अर्ज बाद झाल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. केवळ शिवसेनाच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या एका उमेदवाराचा अर्जही अवैध ठरला आहे. अतिक्रमणे, थकीत घरपट्टी आणि अपूर्ण कागदपत्रे अशा विविध तक्रारींवर सुनावणी घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अपक्ष म्हणून लढण्याची संधी?

शिवसेनेसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, ज्या उमेदवारांचे अधिकृत पक्षीय अर्ज (AB Form मुळे) बाद झाले आहेत, त्यांचे ‘अपक्ष’ म्हणून भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यामुळे हे उमेदवार पक्षाच्या चिन्हाऐवजी अपक्ष म्हणून रिंगणात राहू शकतात. आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून २ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत आहे. बंडखोरी रोखण्यासाठी आणि आघाड्यांचे गणित जुळवण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरू आहे. माघारीनंतरच अहिल्यानगरच्या राजकारणाचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!