Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Amol Mitkari: आता पंढरीत विठ्ठल नाही! …हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजित पवारांना भावनिक पत्र

Amol Mitkari: आता पंढरीत विठ्ठल नाही! …हा शेवटचा पत्रव्यवहार, अमोल मिटकरीचं अजित पवारांना भावनिक पत्र

Amol Mitkari: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे सगळेच बडे नेते बारामतीत दाखल झाले होते.

माजी आमदार अमोल मिटकरी हे देखील आले होते. यावेळी मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी ‌या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. तसेच त्या ठिकाणी मिटकरी यांनी दिवंगत अजित पवार यांना लिहलेलं एक पत्र देखील ठेवलं आहे. बारामतीत तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही, आता हा शेवटचा पत्रव्यव्हार तुमच्या बलिदान स्थळी असा उल्लेख मिटकरींनी केला आहे.

पत्रात नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

आदरणीय दादा,
28 जानेवारी 2026 च्या काळ्‌या दिवसानंतर आज आद‌र‌णीय सुनेत्रा वहिनींच्या बारामती पोटनिवडणुकीच्या निमीत्ताने दुसयोध गोजुबावी ‌ह्या दुर्देवी स्थळी आलोय. बारामती मधे तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही. आता हा शेवटचा पत्रव्यव्हार तुमच्या बलिदान स्थळी. बलिदान स्थळ म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलेल तुमचं बलिदान. तुमच्या बाबत मात्र महाराष्ट्र दुदैवी ठरला की तुम्ही दुर्देवी ठरला हे कोडं आता मरेपर्यंत उलगडणार नाही. गोजुबावीचं रहस्य या माळरानावर दबलयं.

आज माझ्या भावना निशब्द आहेत. तुम्ही दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आता तुमचं जाणं हे गुढ राहू नये. तुम्हाला न्याय मिळाला पाहीजे. राज्यातील तुमच्या चाहत्यांना एकत्र करुन नवा लढा उभारेल. इतकीच सेवा करु शकलो.

तुम्ही दिलेला बॅच आणि आय कार्ड तुमच्या चरणी अर्पण
माफी असावी!

अजितदादा आजही आपल्यातच आहेत”: सुनेत्रा पवारांची भावूक साद
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आयोजीत केलेल्या मेळाव्याला संबोधित करताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “दोन महिन्यांपूर्वी आम्ही आमचे आधारस्तंभ, अजितदादांना गमावले. दादा आज आपल्यात भौतिकदृष्ट्या नाहीत, यावर आजही माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनानंतर बारामतीवर पोटनिवडणुकीची अशी वेळ येईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांनी आपला शेवटचा श्वासही आपल्या लाडक्या बारामतीच्या मातीतच घेतला.” अजितदादांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!