Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dokadia Family Case: कलिंगड तर सुरक्षित, मग मृत्यूचं कारण काय? पायधुनी प्रकरणातील FDA चा अहवाल पाहून पोलीसही चक्रावले

Dokadia Family Case: कलिंगड तर सुरक्षित, मग मृत्यूचं कारण काय? पायधुनी प्रकरणातील FDA चा अहवाल पाहून पोलीसही चक्रावले

Dokadia Family Case: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या दुर्घटनेमागे कलिंगड कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालामुळे आता फेटाळला गेला आहे. डोकाडिया कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडात कोणत्याही प्रकारचे विषारी घटक किंवा भेसळ आढळली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमकी घटना काय?
गेल्या २५ एप्रिलच्या रात्री डोकाडिया दांपत्य आणि त्यांच्या दोन मुलींनी कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांना तीव्र उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. उपचारादरम्यान या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कलिंगडातून ‘फूड पॉयझनिंग’ झाल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी घरातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.

FDA अहवालातील महत्त्वाचे मुद्दे:
कलिंगडाचा आकार वाढवण्यासाठी किंवा त्यात गोडवा आणि रंग आणण्यासाठी कोणत्याही घातक रसायनांचा वापर केलेला नव्हता. एफडीएने घरातून बिर्याणी, चिकन, पाणी, तांदूळ आणि मसाल्यांसह एकूण ११ नमुने गोळा केले होते. प्राथमिक चाचणीत या कोणत्याही पदार्थात भेसळ आढळलेली नाही. कलिंगड सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या मृत्यूंचे नेमके कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

फॉरेन्सिक अहवालातील धक्कादायक निरीक्षणे
कलिंगड जरी ‘क्लीन’ असले तरी फॉरेन्सिक अहवालाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मृतांच्या शरीराचे विच्छेदन केल्यावर तज्ज्ञांना काही अत्यंत विसंगत गोष्टी आढळल्या. मृतांचे हृदय, मेंदू आणि आतडी हिरवट पडल्याचे दिसून आले आहे. शरीरातील एकाच वेळी अनेक अवयवांची ही स्थिती सामान्य अन्न विषबाधेत (Food Poisoning) सहसा दिसत नाही. हे संपूर्ण शरीरात विष पसरल्याचे लक्षण असू शकते. खाद्यपदार्थांत दोष नसल्याने आता संपूर्ण तपास बॅक्टेरियल चाचण्या आणि फॉरेन्सिक रिपोर्टवर केंद्रित झाला आहे. या कुटुंबाच्या मृत्यूचे हे रहस्य उलगडण्यासाठी आता पोलीस आणि आरोग्य विभाग सखोल चौकशी करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!