Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devendra Fadnavis: ‘पंतप्रधानांचे शब्द पाळा, अन् भविष्यातील संकट टाळा…’; जागतिक युद्धपरिस्थितीवर फडणवीसांचे जनतेला कळकळीचे आवाहन

Devendra Fadnavis: ‘पंतप्रधानांचे शब्द पाळा, अन् भविष्यातील संकट टाळा…’; जागतिक युद्धपरिस्थितीवर फडणवीसांचे जनतेला कळकळीचे आवाहन

Devendra Fadnavis: आखाती देशांमधील तणाव आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे सावट भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार समर्थन केले आहे. “पंतप्रधानांनी सुचवलेले उपाय ही काळाची गरज असून, नागरिकांनी संयम पाळला नाही तर आपल्यालाही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

शेजारील देशांची स्थिती भीषण; भारताला सावध राहण्याची गरज
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. शेजारील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४५० रुपये लिटरवर पोहोचले आहेत. युद्धामुळे जगभरात इंधनाचा तुटवडा असतानाही मोदी सरकारने भारतात पुरवठा खंडित होऊ दिला नाही. मात्र, हा पुरवठा टिकवून ठेवण्यासाठी आता बचतीचे धोरण स्वीकारणे अनिवार्य आहे.

मेट्रो आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवा
पंतप्रधानांच्या आवाहनाचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, भारताकडे स्वतःच्या मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे आपण आयातीवर अवलंबून आहोत. अशा वेळी ज्या शहरांमध्ये मेट्रो सुविधा आहे, तिथे जनतेने खासगी वाहने सोडून मेट्रोचा वापर करावा. तसेच, बैठकांसाठी प्रत्यक्ष प्रवास न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर केल्यास कच्च्या तेलावरील खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण आताच सावध झालो, तरच जागतिक संकटाच्या झळांपासून देशाला वाचवू शकू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!