Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Buldhana Family Suicide: रागाच्या भरात होत्याचं नव्हतं झालं! पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून 4 चिमुरड्यांना विहिरीत फेकलं; नंतर स्वतःही…

Buldhana Family Suicide: रागाच्या भरात होत्याचं नव्हतं झालं! पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून 4 चिमुरड्यांना विहिरीत फेकलं; नंतर स्वतःही…

Buldhana Family Suicide: घरगुती वादाचे पर्यवसन किती भयंकर आणि जीवघेणे ठरू शकते, याचा एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातून समोर आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि त्यांच्या चार लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण विदर्भ हादरला आहे. एका पित्याने आपल्या चारही निष्पाप मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

किरकोळ कौटुंबिक वादातून भयंकर पाऊल
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाले अंजन गावातील रहिवासी विजय मुसा किराडिया (आदिवासी समाज) याच्या घरात काल पत्नीसोबत काही घरगुती वाद झाला होता. या भांडणामुळे त्याची पत्नी रागाने माहेरी निघून गेली होती. आज सकाळी विजय घरात एकटाच काम करत असताना, त्याच्या वडिलांनी त्याला सहज विचारले, “तू स्वतः घरकाम का करतोयस? तुझी बायको कुठे गेली?” वडिलांच्या या प्रश्नावर विजयला प्रचंड राग आला. आधीच पत्नीशी झालेल्या वादामुळे मानसिक तणावात असलेल्या विजयचा संयम सुटला. यानंतर त्याने एक भयंकर निर्णय घेतला.

विहिरीतून काढले पाचही मृतदेह
रागाच्या भरात विजय आपल्या चारही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडला. त्याने राजुरा धरण परिसरातील एक विहीर गाठली आणि आपल्या चार मुलांना थेट विहिरीत फेकून दिले. मुले पाण्यात बुडाल्यानंतर त्याने स्वतःही विहिरीत झोकून दिले. या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या मुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रित किराडिया
  • प्राची किराडिया
  • पूर्वी किराडिया
  • पियुष किराडिया

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने राजुरा धरण परिसरात धाव घेतली. विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

परिसरात शोककळा
एकाच वेळी घरातील पाच जणांचा, विशेषतः चार निष्पाप चिमुरड्यांचा अशा क्रूर पद्धतीने अंत झाल्याने भाले अंजन आणि राजुरा गावावर शोककळा पसरली आहे. एका संतापाच्या भरात संपूर्ण हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!