Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मतचोरीचे आरोप ‘चुकीचे आणि निराधार’; राहुल गांधींवर निवडणूक आयोगाचा पलटवार

मतचोरीचे आरोप ‘चुकीचे आणि निराधार’; राहुल गांधींवर निवडणूक आयोगाचा पलटवार

EC On Rahul Gandhi: आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी असा दावा केला की मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर मते वगळण्यात आली. दरम्यान, पत्रकार परिषद संपताच निवडणूक आयोगाने त्वरित प्रतिक्रिया देत राहुल गांधींचे आरोप पूर्णपणे फेटाळले.

आयोगाने म्हटले की हे आरोप ‘खोटे आणि निराधार’ असून, कोणताही नागरिक ऑनलाइन पद्धतीने मत वगळू शकत नाही. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मत वगळण्यापूर्वी संबंधित नागरिकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते.

अलंड मतदारसंघाचा उल्लेख –

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत कर्नाटकातील अलंड विधानसभा मतदारसंघातील 6018 मते वगळण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपावर स्पष्टीकरण देताना आयोगाने सांगितले की, 2023 मध्ये या मतदारसंघात काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, मात्र त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः आयोगानेच एफआयआर दाखल केला होता. नोंदींनुसार, 2018 मध्ये अलंड मतदारसंघ भाजपचे सुभाष गुट्टेदार यांनी जिंकला होता, तर 2023 मध्ये काँग्रेसचे बी.आर. पाटील विजयी झाले होते.

मत वगळण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टता

दरम्यान, आयोगाने स्पष्ट केले की, राहुल गांधी यांनी सुचविल्याप्रमाणे कोणतेही मत अचानक किंवा गुप्तपणे वगळले जाऊ शकत नाही. प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याची पूर्ण संधी दिल्यानंतरच अशी कारवाई केली जाते. आयोगाने यावर भर दिला की न्याय्य आणि पारदर्शक निवडणूक ही आमची जबाबदारी आहे, आणि कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!