EC On Rahul Gandhi: आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी असा दावा केला की मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर मते वगळण्यात आली. दरम्यान, पत्रकार परिषद संपताच निवडणूक आयोगाने त्वरित प्रतिक्रिया देत राहुल गांधींचे आरोप पूर्णपणे फेटाळले.
आयोगाने म्हटले की हे आरोप ‘खोटे आणि निराधार’ असून, कोणताही नागरिक ऑनलाइन पद्धतीने मत वगळू शकत नाही. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मत वगळण्यापूर्वी संबंधित नागरिकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते.
अलंड मतदारसंघाचा उल्लेख –
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत कर्नाटकातील अलंड विधानसभा मतदारसंघातील 6018 मते वगळण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपावर स्पष्टीकरण देताना आयोगाने सांगितले की, 2023 मध्ये या मतदारसंघात काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, मात्र त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः आयोगानेच एफआयआर दाखल केला होता. नोंदींनुसार, 2018 मध्ये अलंड मतदारसंघ भाजपचे सुभाष गुट्टेदार यांनी जिंकला होता, तर 2023 मध्ये काँग्रेसचे बी.आर. पाटील विजयी झाले होते.
❌Allegations made by Shri Rahul Gandhi are incorrect and baseless.#ECIFactCheck
✅Read in detail in the image attached 👇 https://t.co/mhuUtciMTF pic.twitter.com/n30Jn6AeCr
— Election Commission of India (@ECISVEEP) September 18, 2025
मत वगळण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टता
दरम्यान, आयोगाने स्पष्ट केले की, राहुल गांधी यांनी सुचविल्याप्रमाणे कोणतेही मत अचानक किंवा गुप्तपणे वगळले जाऊ शकत नाही. प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याची पूर्ण संधी दिल्यानंतरच अशी कारवाई केली जाते. आयोगाने यावर भर दिला की न्याय्य आणि पारदर्शक निवडणूक ही आमची जबाबदारी आहे, आणि कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये.


