Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत 2 महिला नक्षलवादी ठार; AK-47 आणि जिवंत काडतुसे जप्त

Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत 2 महिला नक्षलवादी ठार; AK-47 आणि जिवंत काडतुसे जप्त

Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध गुरुवारी झालेल्या कारवाईत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. एटापल्ली तहसीलच्या जंगलात सी60 कमांडोंसोबत झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादींना ठार करण्यात आलं. या महिला नक्षलवाद्यांवर एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

मृत महिलांमध्ये सुमित्रा उर्फ सुनीता वेलाडी हिचा समावेश असून तिच्यावर 6 लाखांचे बक्षीस होते. दुसरी महिला म्हणजे ललित उर्फ लड्डो, गट्टा दलाची एसीएम, जी कांकेर जिल्ह्यातील रहिवासी होती. तिच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एके-47 रायफल, पिस्तूल, 37 जिवंत काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेत सीआरपीएफ आणि पाच सी60 पथकांचा सहभाग होता. दोन्ही बाजूंनी जवळपास एक तास चकमक सुरू राहिली. नंतर घटनास्थळावर शोध मोहीम हाती घेण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला.

दरम्यान, ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह काल हेलिकॉप्टरने गडचिरोली पोलिस मुख्यालयात आणण्यात आले आणि तेथे त्यांची ओळख पटवण्यात आली. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा सातत्याने कार्यरत असून ही कारवाई त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!