Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लातूर हादरलं! फ्रेशर्स पार्टीत हल्ला; 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू; 6 विद्यार्थ्यांना अटक

लातूर हादरलं! फ्रेशर्स पार्टीत हल्ला; 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू; 6 विद्यार्थ्यांना अटक

Latur Crime News: लातूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका खाजगी महाविद्यालयातील फ्रेशर्स पार्टीदरम्यान झालेल्या हिंसक वादातून दुर्दैवी घटना घडली. या भांडणात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय सूरज शिंदे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सहा विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या प्रकरणात नवीन भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली खून, गंभीर दुखापत आणि गुन्हेगारी धमकीचे आरोप लावण्यात आले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

ही घटना ८ ऑक्टोबर रोजी लातूरच्या एमआयडीसी परिसरातील एका प्रतिष्ठित खाजगी महाविद्यालयात घडली. वार्षिक फ्रेशर्स पार्टी सुरू असताना काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला, परंतु काही क्षणांतच तो वाद हिंसक संघर्षात बदलला. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, सूरज शिंदेवर काही विद्यार्थ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापती झाल्या. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – इंदापूर हादरलं! पुलाखाली आढळला गर्भवती महिलेचा कुजलेला मृतदेह

सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेनंतर तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. १६ ऑक्टोबरपर्यंत चार संशयितांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान पुरावे समोर आल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपींवर BNS अंतर्गत खून, गंभीर दुखापत करणे, धोकादायक शस्त्रांचा वापर, गुन्हेगारी धमकी आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हल्ला पूर्वनियोजित होता का अचानक झाला? हे स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे. लवकरच सर्व पुरावे गोळा करून आरोपपत्र सादर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर लातूरमधील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅम्पस कार्यक्रमांदरम्यान सुरक्षा व्यवस्था आणि पर्यवेक्षण अधिक कडक करण्याची मागणी होत आहे. तथापी, कॉलेज प्रशासनावर पुरेशी खबरदारी न घेतल्याचा आरोपही केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!