Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘तेरा लड़का कहा है बे, मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगने का नहीं’; चहा विक्रेत्याला धमकावत चाकूने केला प्राणघातक हल्ला

‘तेरा लड़का कहा है बे, मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगने का नहीं’; चहा विक्रेत्याला धमकावत चाकूने केला प्राणघातक हल्ला

नागपूर : हत्या, गोळीबार, खंडणी, अपहरणाबरोबरच शहरात दादागिरीचा प्रकार पुढे आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. दोन गुंड एका चहाविक्रेत्याच्या दुकानात आले आणि ‘मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगनेका नहीं’ असे धमकावत चहाविक्रेत्यावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दादागिरी करणाऱ्या या गुंडाला पोलिसांनी अटक केली. सय्यद इरशाद उर्फ गुड्डू सय्यद अजीज (२६, रा. वनदेवीनगर, यशोधरानगर), असे आरोपीचे नाव आहे.

निसार खान अब्दुल कहन खान (५१, रा. वांजरा ले-आउट, वनदेवीनगर, यशोधरानगर) यांचे संतोषनगर चौकात चहाचे दुकान आहे. त्यांच्याच वस्तीत आरोपी सय्यद राहतो. त्याचा निसार खान यांच्या मुलाशी जुना वाद होता. गुरुवार, १७ एप्रिलला रात्री ८ वाजताच्या सुमारास सय्यद हा त्याच्या अन्य एका साथीदारासोबत निसार खान यांच्या चहाच्या दुकानात आला आणि ‘तेरा लड़का कहा है बे,’ अशी विचारणा केली. उगाच वाद नको म्हणून निसार खान जास्त काही बोलले नाही.

दादागिरी करणाऱ्या आरोपीला अटक

निसार खान घाबरल्याचे बघता सय्यदची हिंमत वाढली आणि त्याने दमदाटी करण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगनेका नही,’ असे म्हणून सय्यदने निसार खान यांच्यावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाकूहल्ल्यात निसार खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून यशोधरानगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हाटकर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत सय्यदला अटक केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!