Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बाहेरून चालत्या रेल्वेवर दगड भिरकवला, तो थेट पाच वर्षीय आरोहीच्या डोक्यात बसला, त्यानंतर तिने जागेवरच सोडला जीव; सोलापुरातील दुर्दैवी घटना

बाहेरून चालत्या रेल्वेवर दगड भिरकवला, तो थेट पाच वर्षीय आरोहीच्या डोक्यात बसला, त्यानंतर तिने जागेवरच सोडला जीव; सोलापुरातील दुर्दैवी घटना

सोलापूर: कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परत येत असताना चालत्या रेल्वेत बाहेरील अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने पाच वर्षीय चिमूकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोही अजित कांगले असे पाच वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना विजयपूर ते रायचूर पॅसेंजरमध्ये घडली. सोलापुरमधील टिकेकरवाडी स्टेशनजवळ काही अंतरावर ही गंभीर घटना घडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर स्टेशन येताच तातडीने आरोहीला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी आरोहीला तपासून मृत घोषीत केले.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदैवतेच्या दर्शनानंतर आपल्या पाच वर्षांच्या लेकीला घेऊन रेल्वेतून परत येत असताना टिकेकरवाडी स्टेशनजवळ बाहेरील अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर दगड फेकला. हा दगड पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्याला लागला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. स्टेशन येताच कुटुंबियांनी तिला तत्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोहीला मृत घोषित करताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

दरम्यान चालत्या रेल्वेत दगड नेमका कशामुळे आणि कोणी फेकला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोहीच्या कुटुंबियांनी दोषी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेत निष्पाप चिमुकलीचा जीव गेला असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!