Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता, राज ठाकरे -फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता, राज ठाकरे -फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आता या भेटीसंदर्भात एक माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवले जाऊ शकते. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत.

मुंबईसह इतर ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे भाजप काही जागा मनसेला सोडू शकते. अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंक सुरु होणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता.

सध्या राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेनेचे हेमंत पाटील, मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी विधानपरिषदेवर आमदार आहेत. 12 पैकी 5 जागा अजूनही रिक्त असून या जागेवर महायुतीकडून कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!