Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026 : शिंदेंच्या सख्ख्या भाच्याची अजितदादांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री; तिकीटही फायनल

BMC Election 2026 : शिंदेंच्या सख्ख्या भाच्याची अजितदादांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री; तिकीटही फायनल

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता केवळ 48 तास शिल्लक असताना, महायुतीमधील अंतर्गत संघर्षाने टोक गाठले आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जवळच्या नातेवाईकाने राजकीय धक्का दिला आहे. शिंदेंचे भाचे आशिष माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे. या ‘दोस्तीत कुस्ती’मुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांतील वितुष्ट चव्हाट्यावर आले आहे.

शिंदेंचा भाचा आणि भाजपची नेत्या राष्ट्रवादीच्या गोटात

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत ‘आयाराम-गयारामांच्या’ माध्यमातून मित्रपक्षांचीच कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांनी मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून मैदानात उतरवण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादीने केवळ शिंदेंनाच नाही तर भाजपलाही धक्का दिला आहे. भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक 156 मधून उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा – Nawab Malik: अजित पवार गटाकडून 35 उमेदवारांची नावं फायनल; नवाब मलिकांच्या कुटुंबातून 3 जण निवडणुकीच्या रिंगणात

नवाब मलिकांचा ‘फॅक्टर’ आणि युतीचे त्रांगडे

मुंबईत महायुतीचा जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने 20 ते 25 जागांची मागणी लावून धरली आहे. मात्र, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने निवडणूक लढवल्यास त्यांना युतीत घेण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. या पेचामुळे सध्या तरी शिंदेसेना आणि भाजप एकत्र दिसत असले, तरी राष्ट्रवादीने मित्रपक्षांचे उमेदवार फोडून आपली स्वतंत्र ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

पुढचे 24 तास निर्णायक

निवडणुकीच्या रिंगणात कोण कोणाविरुद्ध लढणार आणि महायुतीचे अधिकृत जागावाटप काय असेल, याचे चित्र पुढील 24 तासांत स्पष्ट होईल. राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या रणनीतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!