Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune MHADA Lottery : पुणे म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा संपणार! 4186 घरांचा ‘लकी ड्रॉ’ लवकरच निघणार

Pune MHADA Lottery : पुणे म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा संपणार! 4186 घरांचा ‘लकी ड्रॉ’ लवकरच निघणार

Pune MHADA Lottery: हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आचारसंहितेमुळे रखडलेली पुणे म्हाडा (MHADA Pune) घरांची सोडत आता लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या काही दिवसांत निकालाची घोषणा होऊ शकते.

आचारसंहितेचा अडथळा दूर होणार?

पुणे मंडळाच्या 4,186 घरांसाठीची अर्ज प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापासूनच पूर्ण झाली आहे. मात्र, राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे घरांचा ‘लकी ड्रॉ’ घेण्यास प्रशासकीय अडचणी येत होत्या. ही कोंडी फोडण्यासाठी आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. ही सोडत केवळ एक तांत्रिक प्रक्रिया असून यात कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी आयोगाला पटवून दिले आहे.

एका आठवड्यात सोडत काढण्याची तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. आयोगाची अधिकृत परवानगी मिळताच अवघ्या एका आठवड्याच्या आत घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन म्हाडा प्रशासनाने केले आहे.

सर्वसामान्यांना व्याजाच्या फटक्यातून सुटका

सप्टेंबरपासून हजारो अर्जदारांची अनामत रक्कम (EMD) म्हाडाकडे जमा आहे. ही रक्कम भरण्यासाठी अनेकांनी कर्ज काढले आहे किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला आहे. निकाल लांबल्याने या सर्वसामान्यांवर व्याजाचा मोठा बोजा पडत होता. निकाल लावा किंवा आमच्या पैशांचे व्याज द्या, अशी संतप्त मागणी सोशल मीडियावर केली जात होती. आता सोडत जाहीर झाल्यास अपात्र अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!