Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ramnagar Bus Accident: काळजाचा थरकाप! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; 15 प्रवाशांचा मृत्यू

Ramnagar Bus Accident: काळजाचा थरकाप! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; 15 प्रवाशांचा मृत्यू

Ramnagar Bus Accident: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्याच्या रामनगर-काघोट भागात आज एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. रामनगरहून उधमपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवासी बसचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघाताची तीव्रता इतकी भीषण आहे की, यामध्ये १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली किंवा बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, ज्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, त्यांना उपचारांसाठी हवाई मार्गाने (एअरलिफ्ट करून) मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तातडीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे.

केंद्रीय मंत्र्यांकडून घटनेची दखल
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांनी उधमपूरचे जिल्हाधिकारी (DC) मिंगा शेरपा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काघोट गावात बस अपघात झाल्याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, मी स्थानिक प्रशासनाच्या आणि राजेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या पथकाच्या सतत संपर्कात आहे.” अद्याप प्रशासनाकडून मृतांच्या आकड्याबाबत किंवा अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत कोणतेही अधिकृत सविस्तर निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!