Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devendra Fadnavis : परप्रांतीयांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास…; फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

Devendra Fadnavis : परप्रांतीयांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास…; फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

Devendra Fadnavis : मराठी माणसाच्या हिताच्या बाता करणाऱ्यांच्या २५ वर्षांच्या सत्तेत मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परप्रांतीयांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वरळीतील बीडीडी चाळ परिसरात नागरिकांशी संवाद साधताना फडणवीसांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

‘मराठी अस्मिता संकुचित नाही’

ठाकरे बंधूंकडून निवडणुकीत ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद उभा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले की, “मराठी माणूस कधीही संकुचित नव्हता. आम्हाला आमच्या भाषेचा आणि प्रादेशिक अस्मितेचा अभिमान आहेच, पण मराठी माणूस सुरक्षित असण्यासोबतच त्याचे कल्याण होणे महत्त्वाचे आहे. केवळ भेदभाव करून मते मिळवण्याचे राजकारण आता चालणार नाही.”

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना उत्तर

हिंदुत्वाच्या व्याख्येवरून फडणवीसांनी विरोधकांना घेरले. आमचे हिंदुत्व हे केवळ पूजा पद्धतीपुरते मर्यादित किंवा संकुचित नाही. जे प्राचीन भारतीय जीवनपद्धती आणि संस्कृती मानतात, ते सर्व हिंदू आहेत. त्यामुळे मराठी आणि हिंदू यांना वेगळे करणे अशक्य आहे, असे सांगत त्यांनी विकासालाच हिंदुत्वाचा आधार मानले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, राज्यातील २६ ते २७ महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (महायुती) युतीचाच महापौर बसेल. मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुती ऐतिहासिक विजय मिळवेल. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक हा ‘प्रीतीसंगम’ नसून पराभवाच्या धास्तीने झालेला ‘भीतीसंगम’ आहे. पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष केवळ आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!