Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी! ठाकरेंच्या बाजून निकाल फिरल्यास काय? सरोदेंचे 3 मोठे दावे

शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी! ठाकरेंच्या बाजून निकाल फिरल्यास काय? सरोदेंचे 3 मोठे दावे

Shiv Sena Party Symbol: महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष अन् चिन्हाचा वाद उद्या म्हणजेच २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने दिलेला निकाल कायदेशीररीत्या किती योग्य आहे, याची चाचपणी आता सर्वोच्च न्यायालय करणार आहे. या ऐतिहासिक सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी काही खळबळजनक शक्यता वर्तवल्या आहेत.

उद्याची सुनावणी आणि ‘नंबर ३७’ चे गणित

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा खटला आता निर्णायक वळणावर आहे. मात्र, अ‍ॅड. सरोदे यांच्या मते, सुनावणीच्या यादीत हा खटला ३७ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वेळेअभावी उद्या या प्रकरणाचा नंबर लागणे कठीण वाटत आहे. तरीही, जर उद्या सुनावणी झाली आणि न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला, तर राज्यातील राजकारणात मोठे भूकंप होऊ शकतात.

निकाल फिरल्यास काय? सरोदेंचे ३ मोठे दावे

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत एकनाथ शिंदे यांच्या भविष्याबाबत मोठे दावे केले आहेत: १. शिंदे गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण: जर धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदेंकडून काढून घेतले, तर शिंदे गटाकडे भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यामुळे एकनाथ शिंदेंचे राजकीय वजन पूर्णपणे घटू शकते. २. उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार: मूळ पक्ष आणि चिन्ह परत मिळाल्यास शिंदे गटातील अनेक आमदार आणि नेते पुन्हा ‘मातोश्री’वर परतण्याची शक्यता आहे. ३. मुंबई महापालिकेत नवी समीकरणे: अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मुंबई महापालिकेतील सत्तेची सर्व गणिते फिरवू शकतात.

निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान

२०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ बहाल केले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबतही असाच निकाल लागला होता. या दोन्ही निकालांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या चिन्हांवर लढत दिली, मात्र अधिकृत मालकीचा पेच अद्याप सुटलेला नाही.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!