Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NCP President: राष्ट्रवादीत ‘पवार’ वारसा जपण्याचा प्रयत्न; अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर, विलीनीकरणाच्या चर्चांनाही वेग

NCP President: राष्ट्रवादीत ‘पवार’ वारसा जपण्याचा प्रयत्न; अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर, विलीनीकरणाच्या चर्चांनाही वेग

NCP President : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचे नेतृत्व आणि रिक्त झालेले उपमुख्यमंत्रिपद यावर पक्षात सध्या दोन मतप्रवाह असले तरी, पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडेच सोपवावी, असा सूर महायुतीतील नेत्यांकडून आणि पक्षांतर्गत गटाकडून उमटत आहे. या संकटकाळात पक्षाला सावरणारा खंबीर चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

पहिले प्राधान्य अध्यक्षपदाला: संघटनात्मक बांधणीवर भर
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ‘आधी संघटना, मग सत्ता’ असे धोरण अवलंबले जात आहे. अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांचा राजकीय वारसा जपण्यासाठी अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहावे, असा आग्रह नेत्यांनी धरला आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आणि संघटनात्मक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेतल्याने, त्यांच्याकडेच अध्यक्षपद आणि भविष्यात उपमुख्यमंत्रिपद सोपवावे, अशी मागणी जोर धरत आहे. जरी कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे नाव चर्चेत असले, तरी पवार कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे नेतृत्व देण्यापेक्षा ‘सुनेत्रा वहिनींना’ पुढे करावे, असा कल बहुतांश नेत्यांचा आहे.

विलीनीकरणाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात
अजित पवारांच्या पश्चात आता फुटीचे राजकारण संपवून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ राजकीय नव्हे तर कौटुंबिक निर्णय असल्याने पवार कुटुंब एकत्रित बसून यावर चर्चा करेल आणि अंतिम शब्द शरद पवार यांचाच असेल, असे समजते. बारामतीत आज किंवा उद्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पवार कुटुंबाची भेट घेऊन या संभाव्य विलीनीकरणावर सविस्तर चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रफुल पटेलांची प्राथमिक चर्चा
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, प्रफुल पटेल यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, “आम्हाला हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाबद्दल सध्या पक्षात अंतर्गत चर्चा सुरू आहे.” आमदारांशी संवाद साधून आणि सर्वांच्या भावना लक्षात घेऊनच उपमुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील राजकीय दिशा आणि आव्हाने
अजित पवारांसारख्या मास लीडरच्या निधनानंतर पक्षाची ताकद आणि कार्यकर्त्यांची एकजूट टिकवून ठेवणे हे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान आहे. सुनेत्रा पवार यांना नेतृत्व देऊन कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न पक्षाकडून होऊ शकतो. मात्र, राज्याच्या राजकारणातील या मोठ्या विलीनीकरणाचे किंवा नेतृत्वाचे चित्र शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील सविस्तर चर्चेनंतरच स्पष्ट होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!