Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PCMC Politics : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवा ट्विस्ट; भाजप-राष्ट्रवादी सत्तेत एकत्र येण्याच्या हालचालींना वेग

PCMC Politics : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवा ट्विस्ट; भाजप-राष्ट्रवादी सत्तेत एकत्र येण्याच्या हालचालींना वेग

PCMC Politics : राजकारणात ‘काहीही घडू शकते’ याची प्रचिती आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पाहायला मिळाली. उपमहापौर पदासाठी भाजपने नाव निश्चित केलेले निष्ठावंत नगरसेवक शीतल शिंदे यांनी ऐनवेळी पद स्वीकारण्यास नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली. या नाट्यमय घडामोडीनंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरल्याने, महापालिकेत आता भाजप-राष्ट्रवादी ‘हातमिळवणी’ करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजप निष्ठावंताची नाराजी आणि ‘एक्झिट’
सलग तीन वेळा निवडून आलेले भाजपचे शीतल शिंदे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पक्षाने महापौरपदी रवी लांडगे यांची वर्णी लावल्याने शिंदे प्रचंड नाराज झाले. त्यांना उपमहापौर पदाचा प्रस्ताव देण्यात आला, परंतु “मला हे पद नको” असे ठणकावून सांगत ते महापालिकेतून निघून गेले. पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

संघर्ष संपला? नवी समीकरणे काय सांगतात?
पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमीच भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शहरातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. अजित पवारांना आदरांजली म्हणून राष्ट्रवादीने महापौर पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भाजपचा महापौर बिनविरोध निवडून आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या आदेशानुसार वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला. यामुळे दोन्ही पक्ष आता सत्तेत भागीदारी करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शहरात मोठा संघर्ष टाळण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी दोन्ही पक्षांनी ‘युती’चा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे भाजपमधील निष्ठावंतांच्या नाराजीचा फटका आगामी काळात पक्षाला बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!