Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gas Distribution Rules: गॅस टंचाईवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणाला किती सिलेंडर मिळणार? नवी नियमावली जाहीर

Gas Distribution Rules: गॅस टंचाईवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणाला किती सिलेंडर मिळणार? नवी नियमावली जाहीर

Gas Distribution Rules: संपूर्ण महाराष्ट्र सध्या गॅस टंचाईचा सामना करत असताना, राज्य सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी गॅस वितरणाची नवीन नियमावली (SOP) जारी केली आहे. अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत, यासाठी काही ठराविक संस्थांना प्राधान्याने १०० टक्के पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणाला किती टक्के गॅस मिळणार?
सरकारने वर्गीकरण करून गॅस पुरवठ्याचे प्रमाण निश्चित केले आहे:

  • १०० टक्के पुरवठा (अत्यावश्यक सेवा): रुग्णालये, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, अंगणवाड्या, मध्यान्ह भोजन योजना आणि शासकीय खानावळी.
  • ७० टक्के पुरवठा: उपहारगृहे (Hotels), रेल्वे, संरक्षण क्षेत्र, पोलीस विभाग, तुरुंग आणि हवाई वाहतूक.
  • ५० टक्के पुरवठा: औषध निर्मिती उद्योग (Pharma), बीज प्रक्रिया केंद्रे आणि मत्स्यपालन व्यवसाय.

गॅस एजन्सींवर सरकारची करडी नजर
नव्या नियमांनुसार, गॅस एजन्सींना आता दररोजचा वितरण अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे. कोणत्याही एजन्सीला या कामात हलगर्जीपणा करता येणार नाही, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः सार्वजनिक सेवेतील संस्थांना गॅस नाकारल्यास कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नागरिकांची परिस्थिती: गॅससाठी रांगा, स्वयंपाकासाठी चूल
दुसरीकडे, घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. शहरात गॅस एजन्सींबाहेर सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक मजुरांना दिवसभर रांगेत उभे राहणे शक्य नसल्याने त्यांनी लाकडावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, लकडगंज परिसरात सरपण खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. तथापी, पुणे आणि मुंबईत गॅस पुरवठा विस्कळीत असल्याने नागरिक हवालदिल झाले असून वितरणाकडे डोळे लावून बसले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!