Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Crime News: हृदयद्रावक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; बीडमधील धक्कादायक घटना

Beed Crime News: हृदयद्रावक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; बीडमधील धक्कादायक घटना

Beed Crime News: मैत्रीत आलेल्या एका छोट्याशा दुराव्याने इतका मोठा अनर्थ घडेल, याची पुसटशी कल्पनाही कुंबेफळ ग्रामस्थांना नव्हती. आपल्या जीवलग मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला आपल्याला बोलावले नाही, या कारणातून आलेल्या टोकाच्या नैराश्यातून २४ वर्षीय महेश उद्धव भणगे या तरुणाने विष प्राशन करून आपले जीवन संपवले आहे.

नेमकी घटना काय?
महेशचा एक जवळचा मित्र असून ६ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रांनी महेशला निमंत्रण दिले नाही आणि त्याला वगळूनच सेलिब्रेशन केले. ही बाब महेशच्या मनाला प्रचंड लागली. गेल्या काही दिवसांपासून तो याच कारणाने मानसिक तणावात होता. मंगळवारी दुपारी त्याने घराच्या छतावर जाऊन पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून ते प्राशन केले.

अखेरचे स्टेटस आणि एकाकीपणाची भावना
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर एक भावूक स्टेटस ठेवले होते. “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो,” असे शब्द त्याने स्टेटसवर लिहिले होते. यावरून त्याच्या मनातील एकाकीपणाची आणि नैराश्याची भीषणता स्पष्ट होत आहे.

कुटुंबीयांना बसला मोठा धक्का
दुपारी छतावर झोपायला गेलेला महेश रात्री ८ वाजेपर्यंत खाली आला नाही, म्हणून कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी वर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!