Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indorikar Maharaj: संगमनेरमध्ये रंगणार शाही सोहळा! इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या विवाह; 100 एकरचा भव्य मांडव अन् दिग्गजांची उपस्थिती

Indorikar Maharaj: संगमनेरमध्ये रंगणार शाही सोहळा! इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या विवाह; 100 एकरचा भव्य मांडव अन् दिग्गजांची उपस्थिती

Indorikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. निमित्त आहे त्यांच्या कन्येच्या भव्य लग्नसोहळ्याचे. इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि नवी मुंबईतील उद्योजक सुनील चिलप यांचे सुपुत्र साहिल यांचा विवाह उद्या, रविवारी 3 मे रोजी संपन्न होत आहे.

विवाह सोहळ्याची जय्यत तयारी
संगमनेरमधील गुंजाळवाडी परिसरात हा शाही विवाह पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 100 एकर जागेवर भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ लग्नच नाही तर या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलही पाहायला मिळणार आहे. विवाहापूर्वी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर मुख्य लग्नसोहळा पार पडेल.

राजकीय आणि धार्मिक नेत्यांची मांदियाळी
या विवाह सोहळ्याला राज्यभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, दिग्गज राजकीय नेते आणि वारकरी संप्रदायातील संत-महंत या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या साखरपुड्याच्या भव्यतेवरून समाजमाध्यमांवर इंदोरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दुसऱ्याला साधेपणाचा सल्ला देणारे स्वतः मात्र शाही थाट करतात, अशा आशयाच्या कमेंट्सद्वारे त्यांना ट्रोल करण्यात आले होते. मात्र, या टीकेला न डगमगता महाराजांनी साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य असेल असे जाहीर केले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणेच आता हा सोहळा ऐतिहासिक करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!