Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुणे जिल्ह्यावर शोककळा! भोरनंतर आता चाकणमध्ये 3 वर्षांच्या चिमुरड्याची गळा चिरून हत्या; 16 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुणे जिल्ह्यावर शोककळा! भोरनंतर आता चाकणमध्ये 3 वर्षांच्या चिमुरड्याची गळा चिरून हत्या; 16 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीने क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. चाकण परिसरातील म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 3 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने केवळ अत्याचार करून न थांबता चिमुरड्याचा गळा चिरून त्याला संपवले. या संतापजनक घटनेमुळे परिसरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

आरोपी अल्पवयीन, बिहारचा रहिवासी
या प्रकरणाचा तपास करताना म्हाळुंगे पोलिसांनी एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपी मूळचा बिहार राज्यातील असून, पीडित चिमुरड्याचे कुटुंब मध्य प्रदेशातील आहे. हे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी चाकण परिसरात मजुरीसाठी आले होते. एका अल्पवयीन मुलानेच अशा प्रकारचे अघोरी कृत्य केल्याने समाजमनातून संताप व्यक्त होत आहे.

नराधमाला फाशी द्या!
दुसरीकडे, भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आज गावकऱ्यांनी ‘नसरापूर बंद’ पुकारला. ग्रामस्थांचा संताप इतका अनावर होता की, पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. आरोपीला तात्काळ फाशी द्या, अन्यथा त्याला आमच्या स्वाधीन करा, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

एकामागून एक दोन घटनांनी पुणे सुन्न
काल भोरमध्ये चिमुरडीचा बळी गेला आणि आज चाकणमध्ये चिमुरड्याची हत्या झाली. अवघ्या 24 तासांत घडलेल्या या दोन घटनांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी, गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!