Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Watermelon Deaths: अन्नातून विषबाधा की आणखी काही? पोस्टमार्टम रिपोर्टमधील ‘त्या’ एका संशयाने उडाली पोलिसांची झोप

Watermelon Deaths: अन्नातून विषबाधा की आणखी काही? पोस्टमार्टम रिपोर्टमधील ‘त्या’ एका संशयाने उडाली पोलिसांची झोप

Watermelon Deaths: पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक मोठी अपडेट समोर आली असून, ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळणे हे या मृत्यूंमागचे मोठे कारण असल्याचे मानले जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, बाधितांना रुग्णालयात नेण्यास तब्बल साडेपाच तासांचा विलंब झाला, जो जीवघेणा ठरला.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर कुटुंबातील सदस्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतल्यावर त्यांना थोडा आराम मिळाला. मात्र, थोड्या वेळाने प्रकृती पुन्हा खालावली. अशा गंभीर परिस्थितीत तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे असताना, कुटुंब घरीच थांबले. अखेर दुपारी पावणे बाराच्या सुमारास त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक काय सांगते?
शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक निष्कर्षानुसार, हा प्रकार तीव्र स्वरूपाच्या विषबाधेचा (Acute Poisoning) आहे. मात्र, ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप गूढच आहे.  अन्नामध्ये ‘मॉर्फिन’ सारख्या अत्यंत विषारी घटकांचा समावेश असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कलिंगडामुळेच विषबाधा झाली का? याचा तपास ‘एफडीए’ (FDA) करत असून त्यांचा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

पोलिसी कारवाई आणि तपास
जे.जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत डझनभर लोकांचे जबाब नोंदवले आहेत. ज्या डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार केले, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. सध्या आम्ही अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. व्हिसेरा आणि टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट (विषशास्त्र अहवाल) प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. अहवालात काही निष्पन्न झाल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!