Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज अंतिम फैसला; नराधम कांबळेला फाशी की जन्मठेप? राज्याचे लक्ष न्यायालयाकडे

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज अंतिम फैसला; नराधम कांबळेला फाशी की जन्मठेप? राज्याचे लक्ष न्यायालयाकडे

Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे (वय ६५) याला आज (२९ जून) शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने यापूर्वी आरोपीला दोषी ठरवले असून, आता त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

१ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि अवघ्या १५ दिवसांत सुमारे १२०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी २१ मेपासून सुरू झाली होती.

मागील सुनावणीत न्यायालयात काय घडलं?

मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याची बाजू विचारली होती. त्यावेळी आरोपीने पुन्हा एकदा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत, “मी त्या मुलीला खाऊ घेण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पडलो आणि मुलीलाही दुखापत झाली,” असा दावा केला. मात्र, न्यायालयाने त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट करत, “तुला कोणती शिक्षा व्हायला हवी?” असा प्रश्न विचारला. यावर आरोपीकडे कोणतेही उत्तर नव्हते.

सरकारी पक्षाची फाशीची मागणी

विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपीने केलेले कृत्य अत्यंत क्रूर आणि अमानुष असल्याचे नमूद केले. पीडित बालिकेवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले असून, तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडले की, आरोपीला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही आणि तो समाजासाठी गंभीर धोका आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बचाव पक्षाचा युक्तिवाद

दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी आरोपीचे वय आणि परिस्थितीचा आधार घेत जन्मठेपेची शिक्षा योग्य ठरेल, असा युक्तिवाद केला. आरोपी ६५ वर्षांचा असून तो या घटनेमुळे मानसिक धक्क्यात असल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे.

जलदगतीने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक

नसरापूर प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण झाली आहे. अवघ्या काही आठवड्यांत तपास, दोषारोपपत्र, साक्षीदारांची साक्ष आणि अंतिम युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण राज्यातील सर्वात जलदगतीने सुनावणी पूर्ण झालेल्या गंभीर गुन्ह्यांपैकी एक मानले जात आहे.

आता आज न्यायालय कोणता निर्णय देते, आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!