Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thane News : चिकन खाल्ल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा तडफडून मृत्यू, कुटुंबातील चार जण रुग्णालयात

Thane News : चिकन खाल्ल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा तडफडून मृत्यू, कुटुंबातील चार जण रुग्णालयात

भाईंदर : ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे एका कुटुंबाला विषबाधेमुळे गंभीर संकटाचा सामना करावा लागला आहे. रविवारी (7 सप्टेंबर 2025) रात्री जय बजरंग नगर येथील एका कुटुंबाने चिकन, भात, उकडलेली अंडी आणि वडा पाव यांचा समावेश असलेले जेवण केले. जेवणानंतर काही वेळातच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर इतर चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी रविवारी संध्याकाळी बाजारातून चिकन आणले होते. घरी शिजवलेले हे चिकन कुटुंबाने भात, उकडलेली अंडी आणि वडा पाव यांच्यासोबत खाल्ले. जेवणानंतर काही वेळातच कुटुंबातील 28 वर्षीय पत्नी, त्यांच्या तीन मुली (3, 6 आणि 8 वर्षे वयाच्या), आणि मेहुणे (40) यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावत असल्याने सर्वांना तातडीने भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी (टेंभा) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, तीन वर्षीय मुलगी दिपाली (नकु) याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर चार जणांपैकी दोन मुलींना पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मुलीच्या मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा असल्याचे नमूद आहे. तथापि, दिपालीच्या पोटात कोणतेही अन्न आढळले नाही, ज्यामुळे पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी अन्नाचे नमुने आणि अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. सध्या बाजारातून आणलेल्या चिकनमध्ये विषारी पदार्थ असण्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. अन्नातील इतर घटक किंवा स्वयंपाक प्रक्रियेत काही चूक झाली असण्याची शक्यता तपासली जात आहे. वैद्यकीय आणि रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

ही घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. कुटुंबप्रमुख शिवशंकर रामजिलाल कोईरी (38) यांना त्यांच्या पत्नी राजकुमारी यांनी फोनवर मेहुणे रमेश मोरया यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती दिली. घरी पोहोचल्यावर कोईरी यांना घर आतून बंद असल्याचे आढळले. दार तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना रमेश (30), त्यांची पत्नी नीलम (28), मुली चाहत (8), अनामिका (6), दिपाली (3) आणि मेहुणे राजकुमार उर्फ बबलू (40) बेशुद्ध अवस्थेत आणि तोंडातून फेस येत असल्याचे दिसले. सर्वांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दिपाली वाचू शकली नाही.

या घटनेने भाईंदरच्या जय बजरंग नगर परिसरात घबराट आणि शोककळा पसरली आहे. पोलिसांनी स्थानिकांना खाण्यापिण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आणि उलट्या, जुलाब किंवा पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, नागरिकांना संशयास्पद खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!