Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जळगावात मोठा बनावट कॉल सेंटर घोटाळा उघड! माजी महापौर ललित कोल्हेसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात मोठा बनावट कॉल सेंटर घोटाळा उघड! माजी महापौर ललित कोल्हेसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव: शहरातील ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणाने जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थक ललित कोल्हे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८ जणांना अटक करण्यात आली आहे. ललित कोल्हे यांना ९ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन दिवसांत ६७ विदेशी नागरिकांना कॉल

दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी एल.के. फार्मवर छापा टाकला. या कारवाईत ३१ लॅपटॉप जप्त करण्यात आले. पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ दोन दिवसांत ६७ विदेशी नागरिकांना फसवणूक करणारे कॉल करण्यात आले होते. अंदाजे १२ दिवसांत हे प्रमाण ६५० पेक्षा जास्त असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना दररोज कॉल डेटा डिलिट करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचेही तपासात उघड झाले.

अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह परदेशी नागरिकांना बनावट कॉल

हे कॉल सेंटर अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह इतर देशांतील नागरिकांना लक्ष्य करत होते. बनावट कंपनी एजंट असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक आणि पैसे ट्रान्सफर करून घेतले जात होते. रात्रीच्या वेळीच हे ऑपरेशन सुरू असायचे, जेणेकरून परदेशातील नागरिकांशी सहज संपर्क साधता येईल.

तीन प्रमुख सूत्रधार फरार, लूकआउट नोटीस जारी

या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार म्हणून ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद यांची नावे समोर आली आहेत. हे तिघे सध्या फरार असून, ते देशाबाहेर पलायन करू नयेत म्हणून लूकआउट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

हेही वाचा – Pune Crime : पुण्यात काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना अटक; नेमकं प्रकरण काय?

तपासावर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप

या प्रकरणात दोन मंत्र्यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोपही पुढे आला आहे. एका मंत्र्याने कोल्हेंना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची विनंती केल्याचे, तर दुसऱ्याने कठोर कारवाईसाठी दबाव आणल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर तपासावर राजकीय दबावाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, एसपी महेश्वर रेड्डी यांनी तपास पूर्णपणे निष्पक्ष आहे असे स्पष्ट केले आहे. परदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने हे प्रकरण आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे (ED किंवा CBI) सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!