नवी दिल्ली: रेल्वे भरती बोर्डाने गुरूवारपासून ३२ हजार ४३८ पदांसाठी भरती सुरू केली. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आजपासून (दि. २४) आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतात, असे देखील रेल्वे बोर्डाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
आरआरबीने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, भरती मोहिमेत ३२४३८ विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. याशिवाय, उमेदवार २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या अंतिम तारखेनंतर अर्ज शुल्क भरू शकतील. अर्ज दुरुस्तीसाठी सुधारणा विंडोची तारीख आणि वेळ २५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ आहे, असेही रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. अर्जदारांची वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षाच्या दरम्यान असावी.


