Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Yavatmal Crime: प्रेमासाठी पतीला ‘करंट’ देण्याचा पत्नीचा क्रूर कट उघड; यवतमाळमधील घटनेने उडाली गावकऱ्यांची झोप

Yavatmal Crime: प्रेमासाठी पतीला ‘करंट’ देण्याचा पत्नीचा क्रूर कट उघड; यवतमाळमधील घटनेने उडाली गावकऱ्यांची झोप

Yavatmal Crime: यवतमाळ जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, पतीच्या ओरडण्यामुळे हा कट फसला, मात्र या घटनेने पांगडी गावात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मोरे यांना आपली पत्नी कवडी मोरे हिचे गावातीलच विष्णू कडू याच्याशी अवैध संबंध असल्याचे समजले होते. यावरून घरात सतत भांडणे होत असत. आपल्या प्रेमाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराने गजानन यांना कायमचे संपवण्याचे ठरवले.

नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसाक, ३ मे रोजी रात्री २ च्या सुमारास गजानन मोरे गाढ झोपेत असताना, पत्नीने विजेच्या मुख्य बोर्डमधून ॲल्युमिनियमची तार ओढून तिचे दुसरे टोक पतीच्या शरीराला लावले. विजेचा जोरदार झटका बसताच गजानन मोठ्याने ओरडले आणि जागे झाले. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडाला गंभीर जखमा झाल्या असून ते भाजले गेले आहेत.

दोन्ही आरोपींना बेड्या
घटनेनंतर पीडित पतीने वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली विजेची तार जप्त केली आहे. पत्नी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!