Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalgaon Rain: जळगावमध्ये ढगफुटीजन्य परिस्थिती; 1800 जनावरांचा मृत्यू, 10 गावांना मुसळधार पावसाचा तडाखा

Jalgaon Rain: जळगावमध्ये ढगफुटीजन्य परिस्थिती; 1800 जनावरांचा मृत्यू, 10 गावांना मुसळधार पावसाचा तडाखा

जळगाव: जळगाव आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसामुळे ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किमान 10 गावे प्रभावित झाली आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, 452 घरे पाण्याखाली गेली असून सुमारे 2,500 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तथापी, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, नद्यांमधील पाणीपातळी वाढल्यामुळे गावांत पाणी शिरले असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) बाधित भागांमध्ये पाणी व अन्नसहाय्य पुरवत आहे.

प्राप्त माहितीनुसार, 452 घरे पाण्याखाली गेली आहेत आणि गाळ साचल्याने सुमारे 2500 हेक्टर जमीन खराब झाली आहे. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच जवळपास 1800 जनावरांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारची प्रतिक्रिया

दरम्यान, महाराष्ट्राचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बाधित भागांना भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 4 तहसीलमध्ये सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आणि पिके वाहून गेली आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करून नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!