मुंबई: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या वांगदरी गावातील भरत कराड यांच्या आत्महत्येने राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. वृत्तानुसार, भरत यानी ही आत्महत्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून केली असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. तसेच त्यांनी सर्व समाजातील तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे.
भरत कराड यांनी म्हटलं आहे की, ‘भरत कराड यांच्या मृत्यूने माझे मन खूप दुखावले आहे. अशा बातम्या मनाला पिळवटून टाकतात. जीवनात संघर्ष असतो. परंतु, त्यावर आत्महत्या हा कधीच पर्याय नसतो. हक्कांसाठी लढा द्या, आवाज उठवा, परंतु आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका.’
पंकजा मुंडे यांनी पुढे सांगितले की, ‘गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षशील वृत्तीने त्यांना नेहमीच धैर्य शिकवले आणि तेच संस्कार आता घराघरांत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. कुठलीही परिस्थिती असो, धैर्याने सामोरे जा. आत्महत्येपूर्वी कुटुंब, अपले स्वप्न, आणि समाज यांचा विचार करा, असं त्यांनी आवाहन केलं.
पंकजा मुंडे यांच्या या संदेशातून आईची माया, नेत्याची जबाबदारी आणि समाजाप्रतीची संवेदना स्पष्ट दिसते. त्यांनी सर्व जाती-धर्मातील तरुणांना विनंती केली आहे की, हक्कांसाठी लढताना कधीच जीव देऊ नका. त्वरित मदतीसाठी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत किंवा मानसिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा.


